Tuesday, 7 February 2017

आर्की.अमृता पवार एक चाणाक्ष समाज संघटक



सध्या संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणूकींची रणधुमाळी सुरु झाली आहे.या जिल्हा परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीत जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात देखील यंदा चांगलीच चुरस पहायला मिळणार असून संपूर्ण नाशिक जिल्ह्याच लक्ष या देवगाव गटाकडे वेधलं गेलं आहे.त्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिक जिल्ह्याचे शिक्षणसम्राट डॉ.वसंतराव पवार यांच्या कन्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध आर्किटेक्ट अमृता वसंतराव पवार या देवगाव गटातून राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार आहेत.अनेक वर्षापासून या देवगाव गटात विकास कामांबाबत जनतेमधून नाराजीचा सूर उमटत होता.मात्र आर्की.अमृता पवार यांनी या देवगाव गटातून फॉर्म भरल्या नंतर जनतेतून सकारात्मक भाव/प्रतिसाद पहायला मिळतोय.देवगाव गटातून अजून एक विशेष म्हणजे पहिल्यांदा एक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी इथे मिळणार आहे.
आर्की.अमृता वसंतराव पवार यांचा थोडक्यात परिचय.
अमृता पवार या सध्या उत्तर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी महिला संघटक असून गोदावरी अर्बन को.ऑप.बँकेच्या-चेअरमन,तसेच नाशिक च्या विकासात एक आर्किटेक्ट म्हणून त्यांचा मोलाचा वाटा आहे.

अमृता पवार यांच १ ते १० च शिक्षण निर्मला कोन्व्हेंट,नाशिक येथे तर ११ वी ते १२ वी च शिक्षण के.टी.एच.एम.महाविद्यालयात विज्ञान शाखेतून घेतलं.त्यानंतर मविप्र आर्किटेक्चर कॉलेज ला आर्किटेक्ट च संपूर्ण शिक्षण घेऊन (Master in Landscape Arch.) हि पदवी प्राप्त करून २ वर्ष अहमदाबाद(गुजरात) मध्ये M.L.S.A.चा अभ्यास पूर्ण केला.त्यानंतर त्यांना थेट ऑस्ट्रेलिया वरून खास बोलावणे आले. आणि सलग ४ वर्ष ऑस्ट्रेलियातील(सिडनी) या शहरात त्यांनी आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस केली.त्याचप्रमाणे न्यूयॉर्क,लंडन,मुंबई,दुबई, इत्यादी ठिकाणी देखील त्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम केले आहे.अमृताताई यांनी भारतातील अनेक नामंकित आर्किटेक्चर महाविद्यालयांमध्ये सेमिनार घेऊन आर्किटेक्चर क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना धडे दिले.जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई,जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स दिल्ली,आणि मविप्र आर्किटेक्चर महाविद्यालय,नाशिक इत्यादी नामांकित महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले असून अजूनही त्या सदर महाविद्यालयांमध्ये शिकवण्याच काम करतात.
खरं तर देवगाव गटाला पहिल्यांदाच इतका उच्चशिक्षित उमेदवार मिळाल्याने जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात असून जनतेला अमृता पवार यांच्या माध्यमातून नक्कीच विकास होईल अशी खात्री वाटू लागली आहे.


Sunday, 18 December 2016

'स्वरभास्कर' एक समर्पित संगीत महोत्सव...,,



   abhisabale09@gmail.com
 संगीत म्हणजे मनाला अगदी चिरतरुण करणारी देवाने मानवाला दिलेली एक देणगी आहे अस जरी म्हंटल तरी वावगं ठरणार नाही कारण दरवर्षी हिच चितरुण संगीत संजीवनी आपल्या सारख्या रसिकांसाठी आयोजीत करण ही देखील तितकीच् महत्वाची गोष्ट आहे आणि हेच सत्कार्य पुण्याचे सुरश्री फाऊंडेशन करतय २०११ सालापासून  “स्वरभास्कर संगीत महोत्सव” कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी सुरु करण्यात आला सालाबादाप्रमाणे या वर्षीही २३ डिसेंबर २०१६ ते २५ डिसेंबर २०१६ दरम्यान “स्वरभास्कर  संगीत महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन मा.श्री. प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच शां. व. मुजुमदार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मा. श्री.शशिकांत सुतार, डॉ.अमोल कोल्हे , मा.श्री.विनायक निम्हण आदी  मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तित राहणार आहे.  या कार्यक्रमात गायीका " सौ.रेवा नातू " यांना ‘स्वरभास्कर’ पुरस्कारने सन्मानित  करण्यात येणार आहे. या महोत्सवात  श्री.स्वीकार कट्टी ,श्री. अभिषेक बोरकर ,पं.रामदास पळसुले, पं. शीधर पार्थसारथी , सौ. अपर्णा केळकर, उस्ताद.शाहिद परवेज, श्री.अनुज मिश्रा आदी कलाकारही सहभागी होणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला करण्यात आला आहे. या सुवर्ण संधीचा फायदा तमाम रसिकप्रेमींनी घ्यावा, असे आव्हान गायत्री वैरागकर-जोशी यांनी केले आहे.
    गायत्री वैरागकर-जोशी ह्या एका संगीत  कलाकार कुटुंबातील आहेत. भेंडी बाजार घराण्याचे कुशल गायक नाशिक मधील सुप्रसिद्ध संगीतकार "श्री.शंकरराव वैरागकर" यांची कन्या. “श्री. पं.शंकरराव वैरागकर” यांची कन्या.. पं.शंकरराव वैरागकर यांनी आपल्या घरातूनच सौ. विजयालक्ष्मी वैरागकर-मणेरीकर, गायत्री वैरागकर-जोशी, श्री. ओंकार वैरागकर यांच्याच पाठोपाठ कु. रागेश्री वैरागकर नव्या पिढीतील एक नामवंत कलाकारांपैकी एक. असे उत्कृष्ट कलाकार महाराष्ट्राच्या संगीत खजिन्याला प्राप्त करून दिले. यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच " वैरागकर" घराण्याचे नाव संगीतात्मक घराण्याशी जोडले. गायत्रीताईंनी वडिलांच्या सखोल मार्गदर्शनाने लहान वयात संगीतकला आत्मसात केली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून 'संगीत अलंकार " तसेच  पुणे विद्यापीठाच्या M.A. (संगीत) पदवी प्राप्त करून आग्रा-जयपूर "सौ.आरती अंकलीकर-टिकेकर" यांच्या कडून संगीताचे प्रगत प्रशिक्षण प्राप्त केले व  सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवले .त्यांचा आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही . गायत्री वैराग्यकार-जोशी यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या दादरा, ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करतात. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे गायत्रीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

                                   :-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटिल)
                              मु.पो-खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक
                                  abhisabale09@gmail.com


Saturday, 10 December 2016

निफाडच्या देवगाव गटात जनतेला हवाय उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी.......


abhisabale09@gmail.com
नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसातच सुरु होणार आहे.
मात्र बऱ्याच वर्षांपासून निफाड तालुक्यातील देवगाव गट अनेक प्रतिनिधी निवडून आल्यानंतर देखील विकासापासून वंचित आहे.या गटात यावेळी कोण प्रतिनिधी बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याच लक्ष लागलय.फक्त अश्वासनांचा पाऊस पाडून येथून मागील लोकप्रतिनिधी निवडून आल्याचे सांगितले जाते.मात्र सध्या याच देवगाव गटात इतर लोकप्रतिनिधींना आदर्श घालून देणारी नवीन आदर्शवत चळवळ घडतेय ती महाराष्ट्राच्या नामवंत आर्किटेक्ट,गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा आणि एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असणाऱ्या आर्की.अमृताताई वसंतराव पवार यांच्या माध्यमातून.
आर्की.अमृताताई वसंतराव पवार या नाशिक जिल्ह्याचे शिक्षणसम्राट डॉ.वसंतराव पवार यांच्या कन्या आहेत.
त्या स्वतः उच्चशिक्षित असून देवगाव गटाचा खऱ्या अर्थाने विकास करतील तर त्या आर्की.अमृताताई पवार चं.असा विश्वास देवगाव गटातील जनतेकडून बळावला जातोय.
कारण बहुतांश लोकप्रतिनिधी हे निवडणुकीच्या आधी आश्वासन देवून मग निवडणुकीनंतर  विकासाकडे जमले तर लक्ष देतात.मात्र या बाबत अमृताताई पवार यांनी इतर लोकप्रतिनिधींना आदर्श घालून दिला आहे तो असा कि निवडणुकी आधी अमृताताई पवार यांनी देवगाव गटातील जवळ पास ७०% गावांमध्ये विकासकामांना सुरुवात करून ते पूर्ण केले आहेत.तसेच आर्की.अमृता ताई पवार यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्या स्वतः उत्तर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी महिला संघटक आहेत.खासदार सुप्रियाताई सुळे आणि भारताचे माजी कृषिमंत्री मा.शरद पवार साहेब यांच्याशी आर्की.अमृताताई पवार यांचा दांडगा संपर्क असून याचा देखील फायदा देवगाव गटाच्या विकासासाठी निश्चितच होणार आहे.

                                                                                                abhisabale09@gmail.com

Tuesday, 6 December 2016

ग्लोबल व्हिजन स्कूलची अनोखी “ संगीत स्पर्धा ”

:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)

 ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या पुढाकाराने रॉकिंग बॅण्ड’-एक अनोखी संगीत स्पर्धा येत्या २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. रॉकिंग बॅण्डगीत लिहा, संगीतबद्ध करून सादर करा केवळ ६० मिनिटात , हि  एक अनोखी स्पर्धा छोट्या शालेय कलाकारांसाठी आहे .. ह्या स्पर्धेचे  वैशिष्ठ्यम्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा नाशिकमध्ये आयोजित होत आहे. विध्यार्थी  फक्त अभ्यासातील  पुस्तकी किडे  बनलेले   आहेत असं  मत  आधी होते,आतापर्यंत  लिखित स्वरूपातील ज्ञानच  मुलांना मिळत होते पण आजच्या  युगात मुलांचे करिअर निवडण्यासाठी देखील त्यांचा  सुप्तगुणांचा वापर शाळेपासून कसा होतो हे या  स्पर्धेमधून  दाखवले   जाईल.
हि एक  ग्रुप ऍक्टिव्हिटी असल्यामुळे   सर्वाना  सोबत  घेऊन  कसे  काम करावे व त्यात यश संपादन करावे हे या स्पर्धेतुन शिकतायेण्यासारखे आहे. गाणे लिहायची आवड  असेल ,संगीतकार, संगीत संयोजक बनण्याची संधी यातून प्राप्त होईल.
या स्पर्धेत साधारणपणे ५ ते ७ विद्यार्थ्यांच्या संघाने केवळ ६० मिनिटांमध्ये आयत्यावेळी सोडतीद्वारे मिळालेल्या विषयावर गीत लिहिणे ,गीतासाठी संगीत रचना करणे आणि सराव करून सवाद्य लयबद्ध गीत सादर  करणे असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. 
सदर स्पर्धा दोन गटात होत असून पहिल्या गटात इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात तर दुसऱ्या गटात इयत्ता ८ वी ते १० वी चे विद्यार्थी आपले कसब दाखवू शकतात, संगीत व गायन क्षेत्रात उगवत्या बाल कलाकारांना त्यांच्यातील कलागुण सादर करण्यासाठी हि स्पर्धा म्हणजे अनोखे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी हि संधी न दवडता नावनोंदणीसाठी principal.gvis@gmail.com ह्या इमेल आयडी वर अर्ज भरून पाठवावेत. 
    विजेत्यांना प्रमाणपत्रासह मानचिन्ह,आकर्षक भेटवस्तू आणि रोख बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे,तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त विविध वैयक्तिक प्रकारात हि विशेष बक्षिसे असणार आहेत. विद्यार्थी व शाळांनी अधिक माहितीसाठी ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनलस्कूल मध्ये संपर्क साधावा. 
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका सौ . विजयालक्ष्मी  मणेरीकर यांनी नासिकच्या सर्व संगीत प्रेमींना या स्पर्धे साठी लवकरात लवकर नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे.तसेच या स्पर्धेमध्ये खाजगी संगीत विद्यालय आपला सहभाग नोंदवू शकतात.
संगीत स्पर्धा संकल्पना :-
सहभागी विद्यार्थ्यांची भूमिका :- 
* प्रत्येक गटातील फक्त २-३ विद्यार्थी वाद्य वाजवतील.
1) गीतकार
2) संगीतकार
3) संगीत संयोजक
4) वादक 
5) गायक
* नोंदणी :-
1) नाव नोंदणीसाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज भरून पाठवावा :- principal.gvis@gmail.com
2)  प्रत्येक गटासाठी प्रवेश फी १०००/-  अनिवार्य
3) नाव नोंदणी दिनांक   15 / 12 / 2016 पूर्वी करावी.
4) शाळेची नोंदणी हि प्रवेश फी भरल्यानंतरच ग्राह्य धरली जाईल .
5) नाव नोंदणी नंतर अर्ज रद्द केला जाणार नाही.
6) कोणत्याही  कारणास्तव  प्रवेश फि परत केली जाणार नाही.
* बक्षिसे :-
1) प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि एक भेटवस्तू दिली जाईल.
2) विजेत्या गटाला मानचिन्ह, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षीस दिले जाईल.
* विशेष बक्षिसे :-
                1) सर्वोत्तम गायक
                2) सर्वोत्तम गीत               
               
3) सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक.
                4) सर्वोत्तम गट
                5) सर्वोत्तम नाविन्यपूर्ण संकल्पना
   अटी व शर्ती :-
1) हि एक ग्रुप अक्टिव्हिटी आहे त्यामुळे गीत सादरीकरणासाठी एक गट फक्त एकाच भाषेचा वापर करू शकतो.
2) प्रत्येक गट 08:30 वाजता GVIS मध्ये अहवाल देतील. 
3) प्रत्येक शाळेतील कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 गट एका संघासाठी सहभागी होऊ शकतात.
4) शाळेचा मुख्य विद्यार्थी प्रत्येक गटातील इतर विद्यार्थ्यांची भूमिका ठरवू शकतो.
5) प्रत्येक गटाला सोडत प्रणाली द्वारे सादरीकरणासाठी एका विषय दिला जाईल. जो तुम्ही हिंदी, इंग्रजी व मराठी यापैकी कोणत्याही एक भाषेत सादर करू शकता
6) प्रत्येक गटाला रचना, संगीत दिग्दर्शन, संगीत व्यवस्था, वाद्य सराव आणि अंतिम सराव यासर्वांसाठी एकत्र 60 मिनिटे मिळतील.
7) प्रत्येक गटाला सादरीकरण आणि व्यवस्थेसाठी 5 मिनीटे मिळतील
8) प्रत्येक गट स्वतःची वाद्य घेऊन येईल. (उदाहरणार्थ कीबोर्ड, हार्मोनियम, ढोल, ताशे, खंजेरी, तबला, गिटार इ. किंवा तुम्ही या उल्लेख वाद्यांपेक्षा  इतर कोणत्याही सर्जनशील वाद्यांचा उपयोग शकता.)
9) प्रत्येक गटाला लिखाणासाठी लागणारे कागद व लेखणी शाळेच्या केंद्रात प्राप्त होईल.
10) कोणताही गट स्पर्धे दरम्यान कुठल्याच शिक्षकांची मदत घेऊ शकणार नाही.
11) प्रत्येक गटातील सदस्य गीत सादरीकरणामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
12) स्पर्धे दरम्यान  मोबाइल, टॅब,  आय-फोन अशा प्रकारची कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
13) संघाच्या  निर्णयाप्रमाणे वेशभूषा करू शकता. फक्त शाळेचे ओळखपत्र आवश्यक आहे .
14) विद्यार्थी सकाळ पासून संध्याकाळपर्यत स्पर्धेत असल्यामुळे त्यांचा दोन वेळचा पुरेसा जेवणाचा डबा आणि पाण्याची बॉटल सोबत असावी.
15) शाळेने स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांना घेऊन यावे व घेऊन जावे. 
16) तयार होणारे गाणे 3 मिनिटांपेक्षा जास्त नसावी.
17) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारच्या वादाची दखल घेतली जाणार नाही.
* अधिक माहिती साठी :-
कार्यालय  :- 0253-2382900
 मोबाइल  :- 7770077014
 ई-मेल  :- principalgvis@gmail.com
  Wab  : - www..globalvisionnasik.com /
:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५



Monday, 5 December 2016

जयललिता प्रभावशाली व्यक्तिमत्व....

:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
जयललिता जयराम (जन्म - २४ फ़रवरी १९४८) ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम (अन्ना द्रमुक) की की वर्तमान महासचिव तथा तमिलनाडु की मुख्यमंत्री हैं। उन्हें राज्य की दूसरी महिला मुख्‍यमंत्री बनने का सौभाग्य प्राप्त हैं। पूर्व के दिनों में वे मुख्य रूप से तमिल फिल्मों की अभिनेत्री थीं, किन्तु उन्होंने तमिल के अलावा तेलुगू, कन्नड और एक हिंदी तथा एक अँग्रेजी फिल्म में भी काम किया है। जब वे स्कूल में पढ़ रही थीं तभी उन्होंने 'एपिसल' नाम की अंग्रेजी फिल्म में काम किया। वे 15 वर्ष की आयु में कन्नड फिल्मों में मुख्‍य अभिनेत्री की भूमिकाएं करने लगी थीं। इसके बाद वे तमिल फिल्मों में काम करने लगीं। वे दक्षिण भारत की पहली ऐसी अभिनेत्री थीं जिन्होंने स्कर्ट पहनकर फिल्मों में भूमिका निभाई थी। 1965 से 1972 के दौर में उन्होंने अधिकतर फिल्में एमजी रामचंद्रन के साथ की।फिल्मी करियर के बाद उन्होने एम॰जी॰ रामचंद्रन के साथ 1982 में राजनीतिक करियर की शुरुआत की। उन्होंने 1984 से 1989 के दौरान तमिलनाडु से राज्यसभा के लिए राज्य का प्रतिनिधित्व भी किया। वर्ष 1987 में रामचंद्रन का निधन के बाद उन्होने खुद को रामचंद्रन की विरासत का उत्तराधिकारी घोषित कर दिया। वे 24 जून 1991 से 12 मई 1996 तक राज्य की पहली निर्वाचित मुख्‍यमंत्री और राज्य की सबसे कम उम्र की मुख्यमंत्री रहीं। अप्रैल 2011 में जब 11 दलों के गठबंधन ने 14वीं राज्य विधानसभा में बहुमत हासिल किया तो वे तीसरी बार मुख्यमंत्री बनीं। उन्होंने 16 मई 2011 को मुख्‍यमंत्री पद की शपथ लीं और तब से वे राज्य की मुख्यमंत्री हैं। राजनीति में उनके समर्थक उन्हें अम्मा (मां) और कभी कभी पुरातची तलाईवी ('क्रांतिकारी नेता') कहकर बुलाते हैं।

प्रारंभिक जीवन

जयललिता का जन्म 24 फ़रवरी 1948 को एक 'अय्यर' परिवार में, मैसूर राज्य (जो कि अब कर्नाटक का हिस्सा है) के मांडया जिले के पांडवपुरा तालुक के मेलुरकोट गांव में हुआ था। उनके दादा तत्कालीन मैसूर राज्य में एक सर्जन थे। महज 2 साल की उम्र में ही उनके पिता जयराम, उन्हें माँ संध्या के साथ अकेला छोड़ कर चल बसे थे। पिता की मृत्यु के पश्चात उनकी मां उन्हें लेकर बंगलौरचली आयीं, जहां उनके माता-पिता रहते थे। बाद में उनकी मां ने तमिल सिनेमा में काम करना शुरू कर दिया और अपना फिल्मी नाम 'संध्या' रख लिया।
उनकी प्रारंभिक शिक्षा पहले बंगलौर और बाद में चेन्नई में हुई। चेन्नई के स्टेला मारिस कॉलेज में पढ़ने की बजाय उन्होंने सरकारी वजीफे से आगे पढ़ाई की


फिल्मी जीवन

 जब वे स्कूल में ही पढ़ रही थीं तभी उनकी मां ने उन्हें फिल्मों में काम करने के लिए राजी कर लिया। विद्यालई शिक्षा के दौरान ही उन्होंने 1961 में 'एपिसलनाम की एक अंग्रेजी फिल्म में काम किया। मात्र 15 वर्ष की आयु में वे कन्नड फिल्मों में मुख्‍य अभिनेत्री की भूमिकाएं करने लगी। कन्नड भाषा में उनकी पहली फिल्म 'चिन्नाडा गोम्बेहै जो 1964 में प्रदर्शित हुई।उसके बाद उन्होने तमिल फिल्मों की ओर रुख किया। वे पहली ऐसी अभिनेत्री थीं जिन्होंने स्कर्ट पहनकर भूमिका निभाई थी।


तमिल सिनेमा में उन्होंने जाने माने निर्देशक श्रीधर की फिल्म 'वेन्नीरादई' से अपना करियर शुरू किया और लगभग 300 फिल्मों में काम किया। उन्होंने तमिल के अलावा तेलुगु, कन्नड़, अँग्रेजी और हिन्दी फिल्मों में भी काम किया है। उन्होंने धर्मेंद्र सहित कई अभिनेताओं के साथ काम किया, किन्तु उनकी ज्यादातर फिल्में शिवाजी गणेशन और एमजी रामचंद्रन के साथ ही आईं।

राजनीतिक जीवन

जयललिता और अमेरिकी विदेश सचिव हिलेरी क्लिंटन
 अम्मा ने 1982 में ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम (अन्ना द्रमुक) की सदस्यता ग्रहण करते हुए एम॰जी॰ रामचंद्रन के साथ अपने राजनीतिक जीवन की शुरुआत की। 1983 में उन्हें पार्टी का प्रोपेगेंडा सचिव नियुक्त किया गया। बाद में अंग्रेजी में उनकी वाक क्षमता को देखते हुए पार्टी प्रमुख रामचंद्रन ने उन्हें राज्यसभा में भिजवाया और राज्य विधानसभा के उपचुनाव में जितवाकर उन्हें विधानसभा सदस्य बनवाया। 1984 से 1989 तक वे तमिलनाडु से राज्यसभा की सदस्य रहीं। बाद मेंपार्टी के कुछ नेताओं ने उनके और रामचंद्रन के बीच दरार पैदा कर दी। उस समय वे एक तमिल पत्रिका में अपने निजी जीवन के बारे में कॉलम लिखती थीं पर रामचंद्रन ने दूसरे नेताओं के कहने पर उन्हें ऐसा करने से रोका। 1984 में जब मस्तिष्क के स्ट्रोक के चलते रामचंद्रन अक्षम हो गए तब जया ने मुख्यमंत्री की गद्‍दी संभालनी चाहीलेकिन तब रामचंद्रन ने उन्हें पार्टी के उप नेता पद से भी हटा दिया।


वर्ष 1987 में रामचंद्रन का निधन हो गया और इसके बाद अन्ना द्रमुक दो धड़ों में बंट गई। एक धड़े की नेता एमजीआर की विधवा जानकी रामचंद्रन थीं और दूसरे की जयललिता, लेकिन जयललिता ने खुद को रामचंद्रन की विरासत का उत्तराधिकारी घोषित कर दिया।
वर्ष 1989 में उनकी पार्टी ने राज्य विधानसभा में 27 सीटें जीतीं और वे तामिलनाडु की पहली निर्वाचित नेता प्रतिपक्ष बनीं।
वर्ष 1991 में राजीव गांधी की हत्या के बाद राज्य में हुए चुनावों में उनकी पार्टी ने कांग्रेस के साथ चुनाव लड़ा और सरकार बनाई। वे 24 जून 1991 से 12 मई तक राज्य की पहली निर्वाचित मुख्‍यमंत्री और राज्य की सबसे कम उम्र की मुख्यमंत्री रहीं।
वर्ष 1992 में उनकी सरकार ने बालिकाओं की रक्षा के लिए 'क्रैडल बेबी स्कीम' शुरू की ताकि अनाथ और बेसहारा बच्चियों को खुशहाल जीवन मिल सके। इसी वर्ष राज्य में ऐसे पुलिस थाने खोले गए जहां केवल महिलाएं ही तैनात होती थीं।
1996 में उनकी पार्टी चुनावों में हार गई और वे खुद भी चुनाव हार गईं। इस हार के बाद सरकार विरोधी जनभावना और उनके मंत्रियों के खिलाफ भ्रष्टाचार के कई मामले उजागर हुये। पहली बार मुख्यमंत्री रहते हुए उनपर कई गंभीर आरोप लगे। उन्होंने कभी शादी नहीं की लेकिन अपने दत्तक पुत्र 'वीएन सुधाकरण' की शादी पर पानी की तरह पैसे बहाए। यह विषय भी इन मामलों का एक हिस्सा रहा।
भ्रष्टाचार के मामलों और कोर्ट से सजा होने के बावजूद वे अपनी पार्टी को चुनावों में जिताने में सफल रहीं। हालांकि गंभीर आरोपों के कारण उन्हें इस दौरान काफी कठिन दौर से गुजरना पड़ा, पर 2001 में वे फिर एक बार तमिलनडू की मुख्यमंत्री बनने में सफल हुईं। उन्होंने गैर चुने हुए मुख्यमंत्री के तौर पर कुर्सी संभाल ली। दोबारा सत्ता में आने के बाद उन्होंने लॉटरी टिकट पर पाबंदी लगा दी। हड़ताल पर जाने की वजह से दो लाख कर्मचारियों को एक साथ नौकरी से निकाल दिया, किसानों की मुफ्त बिजली पर रोक लगा दी, राशन की दुकानों में चावल की कीमत बढ़ा दी, 5000 रुपये से ज्यादा कमाने वालों के राशन कार्ड खारिज कर दिए, बस किराया बढ़ा दिया और मंदिरों में जानवरों की बलि पर रोक लगा दी। इसी बीच भ्रष्टाचार के मामले में सुप्रीम कोर्ट ने उनकी नियुक्ति को अवैध घोषित कर दिया और उन्हें अपनी कुर्सी अपने विश्वस्त मंत्री ओ॰ पन्नीरसेल्वम को सौंपनी पड़ी। जब उन्हें मद्रास हाईकोर्ट से कुछ आरोपों से राहत मिल गई तो वे मार्च 2002 में फिर से मुख्यमंत्री की कुर्सी सँभाल ली। हालांकि 2004 के लोकसभा चुनाव में बुरी तरह हारने के बाद उन्होंने पशुबलि की अनुमति दे दी और किसानों की मुफ्त बिजली भी बहाल हो गई।
अप्रैल 2011 में जब 11 दलों के गठबंधन ने 14वीं राज्य विधानसभा में बहुमत हासिल किया तो वे तीसरी बार मुख्यमंत्री बनीं। उन्होंने 16 मई 2011 को मुख्‍यमंत्री पद की शपथ लीं और तब से वे राज्य की मुख्यमंत्री हैं।
माहिती संकलन- विकिपीडिया
:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५